सांगली (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध साहित्यिका सौ. वीणा आशुतोष रारावीकर यांना मिरज, सांगली येथील मासिक सारांश साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. गुजगोष्टी शतशब्दांच्या या ग्रंथलेखनासाठी हा पुरस्कार असून लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती अनिल दबडे व विजयकुमार साने यांनी दिली आहे. साहित्यिका वीणा रारावीकर यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला आहे.